४) वैदिक संस्कृती

 ४) वैदिक संस्कृती

प्रश्न आणि उत्तरे

१) पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा.

१) वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया

उत्तर= लोपामुद्रा, गार्गी,

२ ) वेदकालीन मनोरंजनाची साधने

उत्तर= विना , झांजा, शंख

३ ) वेदकालीन चार आश्रम

उत्तर= ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम

२ ) चूक की बरोबर ओळखा

१) यज्ञात म्हटले जाणारे मंत्र- ऋग्वेद

उत्तर= चूक

२) अथर्व ऋषींचे नाव दिलेल्या वेद- अथर्ववेद

उत्तर= बरोबर

३ ) यज्ञविधी च्या वेळी मंत्र गायनकरण्यास मार्गदर्शन करणारा वेद- सामवेद

उत्तर= बरोबर

३ ) एका शब्दात उत्तरे लिहा

१ ) वैदिक वांग्मय ची भाषा

उत्तर= संस्कृत

२) विद म्हणजे

उत्तर=

३) गोधूम म्हणजे

उत्तर= गहू

४) घराचा प्रमुख म्हणजे

उत्तर= गृहपती

५ ) श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत

उत्तर= श्रेस्ठी

४ ) नावे लिहा.

१) तुम्हास माहित असलेली वाद्य

उत्तर= संबळ, तुतारी, डमरू ,झांजा, डफली, शंख

२) सध्याच्या काळातील स्त्रियांची किमान दोन दागिने

उत्तर= मंगळसूत्र, मंचली,

३) सध्याच्या मनोरंजनाची साधने

उत्तर= सिनेमा, खेळ, वाचन, म्युझिक

५ ) थोडक्यात उत्तरे लिहा.

१) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता?

उत्तर=

  1. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्य घटकांचा समावेश होता
  2. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत.
  3. दूध ,दही, लोणी, तूप, मद हे पदार्थ हे त्यांचे आवडीचे होते.
  4. उडीद मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता

२) वेदकाळात गाईची विशेष काळजी घेतली जाई?

उत्तर=

  1. वैदिक काळात घोडा, गाय बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते.
  2. गाईचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल
  3. त्यामुळे गाईंना विशेष किंमत होती
  4. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी गाईंची घेतली जात होती.

३) संन्यास आश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती?

उत्तर= संन्यासाश्रम हा चौथा आश्रम आहे

या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहणे, असा संकेत होता. असा संन्यास आश्रमात मनुष्याने वागावे ही अपेक्षा होती.

६) टिपा लिहा

१)वेदकालीन धर्मकल्पना

उत्तर=

  1. वेदकालीन धर्मकल्पना मध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, विज, वादळी, नद्या यासारखे निसर्गातील ना देवता रूप दिलेले.
  2. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेले आहेत.
  3. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला हवी असे म्हणत.
  4. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञ विधींचे स्वरूप साधे होते. पुढे त्याचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्व त्यामुळे वाड्यात गेली.


२) वेदकालीन घरे

उत्तर=

  1. वेदकालीन घरे मातीची किंवा कुडाची असत.
  2. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विनवून त्यांच्यावर शेण-माती लीपून तयार केलेली भिंत म्हणजे कुड.
  3. या घराच्या जमिनी शेणा - मातीने सारवलेल्या असत.
  4. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जातात.

३ ) वेदकालीन शासन व्यवस्था

उत्तर=

  1. वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत.
  2. अनेक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विश. त्यांच्या प्रमुखाला विश पती असे म्हणत.
  3. अनेक विश मिळून जन तयार होत असे.
  4. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत.
  5. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते.


Comments

Popular posts from this blog